बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

समाधान

 समाधान

Couple sitting near Lake with satisfied life

समाधान (Satisfaction)म्हणजे काय?

                मानवी मनाची अशी अवस्था जिथे व्यक्तीच्या सर्व इच्छा , मोठ्या इच्छा, अपेक्षा पूर्ण झाल्या म्हणजे त्यावर विजय मिळवला अशा अवस्थेत व्यक्ती जेव्हा पोहोचतो तेव्हा व्यक्ती समाधानी होतो . समाधान म्हणजे मानवी जीवनाची परिपूर्णता.

                ज्यांचे जीवन परिपूर्ण तोच व्यक्ती सुखी व समाधानी असतो. प्रत्येक मानवी जीवनाचे व मनाचे  अंतिम ध्येय हे समाधानी सुखी जीवन  असते.


आयुष्यात समाधान का आवश्यक आहे?

                मानवी जीवन व मन विविध भावनांनी युक्त आहे. मानवाच्या जीवनात विविध इच्छा,आकांक्षा, अपेक्षा असतात. या जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत व्यक्ती त्या पूर्ण करण्याकरिता प्रयत्न करत असतो. मुळात मानवी जीवनच आपल्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रवास आहे. मानवी जीवनातील एक इच्छा पूर्ण झाली की त्याला समाधान प्राप्त होते. परंतु लगेचच त्याच्या मनात दुसऱ्या इच्छेचा जन्म होतो. आणि तो ती पूर्ण करण्याच्या मागे लागतो. अशाच अनेक इच्छा पूर्ण करण्याचा प्रवास म्हणजेच मानवी जीवन होय. या अशाच अनेक इच्छापूर्ती तून मानवी जीवन समाधानी होते. आणि त्याला जगण्याची नवी उमेद प्राप्त होते.


माणूस खरच परिपूर्ण समाधानी होतो काय?

                मानवी मनाचे आकलन करता असे लक्षात येते की खूपच क्वचित  व्यक्ती असेल ज्या आयुष्यात पूर्णपणे समाधानी आहे. आपल्याला आयुष्यात खूप व्यक्ती मिळतात ज्या म्हणतात कि मी आयुष्यात खूप समाधानी आहे. ईश्वराने मला जे पाहिजे ते सर्व दिले. आता मला आणखी काहीच नको.

                परंतु पूर्ण समाधानाची अवस्था जेव्हा प्राप्त होते, तेव्हा माणसाची जीवन जगण्याची इच्छा नष्ट होते. अशा व्यक्ती जीवन प्रवास पूर्ण करून अनंतात विलीन होतात किंवा तसा प्रयत्न करण्याची मानवी मनाची ओढ होते.

                मानवाने कधीच आयुष्यात पूर्णपणे समाधानी होऊ नये. कारण समाधान मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हेच व्यक्तीला जीवन जगण्याचे बळ देते.

वाचून समाधान मिळाल्यास नक्की share करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Visit again. Follow this blog.

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

दिशाहीन मानवी समाज...

            दिशाहीन मानवी समाज मानवी समाज व्यवस्था  मानवी समाजाचा विचार करायचा झाला तर मानवाच्या उत्क्रांती पासून विचार करायला हवा . मानवाची...