बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

समाधान

 समाधान

Couple sitting near Lake with satisfied life

समाधान (Satisfaction)म्हणजे काय?

                मानवी मनाची अशी अवस्था जिथे व्यक्तीच्या सर्व इच्छा , मोठ्या इच्छा, अपेक्षा पूर्ण झाल्या म्हणजे त्यावर विजय मिळवला अशा अवस्थेत व्यक्ती जेव्हा पोहोचतो तेव्हा व्यक्ती समाधानी होतो . समाधान म्हणजे मानवी जीवनाची परिपूर्णता.

                ज्यांचे जीवन परिपूर्ण तोच व्यक्ती सुखी व समाधानी असतो. प्रत्येक मानवी जीवनाचे व मनाचे  अंतिम ध्येय हे समाधानी सुखी जीवन  असते.


आयुष्यात समाधान का आवश्यक आहे?

                मानवी जीवन व मन विविध भावनांनी युक्त आहे. मानवाच्या जीवनात विविध इच्छा,आकांक्षा, अपेक्षा असतात. या जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत व्यक्ती त्या पूर्ण करण्याकरिता प्रयत्न करत असतो. मुळात मानवी जीवनच आपल्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रवास आहे. मानवी जीवनातील एक इच्छा पूर्ण झाली की त्याला समाधान प्राप्त होते. परंतु लगेचच त्याच्या मनात दुसऱ्या इच्छेचा जन्म होतो. आणि तो ती पूर्ण करण्याच्या मागे लागतो. अशाच अनेक इच्छा पूर्ण करण्याचा प्रवास म्हणजेच मानवी जीवन होय. या अशाच अनेक इच्छापूर्ती तून मानवी जीवन समाधानी होते. आणि त्याला जगण्याची नवी उमेद प्राप्त होते.


माणूस खरच परिपूर्ण समाधानी होतो काय?

                मानवी मनाचे आकलन करता असे लक्षात येते की खूपच क्वचित  व्यक्ती असेल ज्या आयुष्यात पूर्णपणे समाधानी आहे. आपल्याला आयुष्यात खूप व्यक्ती मिळतात ज्या म्हणतात कि मी आयुष्यात खूप समाधानी आहे. ईश्वराने मला जे पाहिजे ते सर्व दिले. आता मला आणखी काहीच नको.

                परंतु पूर्ण समाधानाची अवस्था जेव्हा प्राप्त होते, तेव्हा माणसाची जीवन जगण्याची इच्छा नष्ट होते. अशा व्यक्ती जीवन प्रवास पूर्ण करून अनंतात विलीन होतात किंवा तसा प्रयत्न करण्याची मानवी मनाची ओढ होते.

                मानवाने कधीच आयुष्यात पूर्णपणे समाधानी होऊ नये. कारण समाधान मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हेच व्यक्तीला जीवन जगण्याचे बळ देते.

वाचून समाधान मिळाल्यास नक्की share करा.

रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

दिशाहीन मानवी समाज...

           

दिशाहीन मानवी समाज

मानवी समाज व्यवस्था 

मानवी समाजाचा विचार करायचा झाला तर मानवाच्या उत्क्रांती पासून विचार करायला हवा . मानवाची उत्क्रांती लाखो वर्षापूर्वी झाली आणि इतर सर्व सजीवांप्रमाणे सहज प्रवृत्ती म्हणून आपले अस्तित्व टिकवण्याची धडपड निर्माण झाली . आपले अस्तित्व टिकवण्यासाठी त्याला अन्नाची गरज होती तसेच इतर प्राण्यांपासून स्वतःचे रक्षण करायचं होतं आणि हे तो सर्व एकाकी राहून करू शकत नव्हता . आणि याच साठी त्याला समूहाची गरज होती . आणि या गरजेतूनच म्हणजेच आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी तो समूह जीवनात राहू लागला . या एकत्रित राहण्यातून त्याला अन्न , निवारा आणि इतर हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण मिळू लागले . या समूह जीवनाचा फायदा त्याला समजू लागला. यातूनच उत्तरोत्तर मानवी समाजाची निर्मिती झाली असावी . या समाजातुन समाजातील प्रत्येक घटकाला , सदस्याला सर्व गरजा पूर्ण करता येत होत्या . या समाजात प्रत्येक मानवाला प्रत्येक मानवी घटकाला समान अधिकार , न्याय प्राप्त होत होता . समाजातूनच मानवाच्या शारीरिक , मानसिक व भावनिक गरजा पूर्ण होत होत्या . समाजातील प्रत्येक घटकाला आपले सुखदुःख ,यश -अपयश समाजातील इतरांसोबत वाटता येत होत्या . त्यामुळेच समाजातील प्रत्येक घटक हा समाजाशी एकोप्याने बांधला गेला होता .

          जसजसा काळ पुढे सरकत होता . समाज प्रगती करत गेला . मानवी समाज आधुनिक झाला. इर्षा ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे. आणि या इर्षेतूनच समाजातील एक गट इतरांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याची होळ निर्माण झाली आणि समाजातील दुर्बल घटक समाजातच दाबले जाण्यास सुरुवात झाली आणि इथूनच समाजाचे आणि समाजाच्या मूळ हेतुचे विद्रुपीकरण व्हायला सुरुवात झाली .

            मानवा-मानवत ,समाजात इर्षेने मूळ धरले . आपल्या समाजापेक्षा तो स्वतःला मोठे समजू लागला . आर्थिक स्वायत्तेने मानवी समाजात फूट पाडण्याचे काम केले आणि समाजातील मानवी घटक केवळ स्वत:च्या कुटुंबापुरताच मर्यादित झाला आणि मानवाची दृष्टी , बुद्धी अधिकच संकुचित झाली आणि आजचा आधुनिक ?प्रगतिशील ? सुसंस्कृत ? मानवी समाज निर्माण झाला.

           आज आजूबाजूला बघितलं तर मन अधिकच विषण्ण होऊन जाते आणि प्रश्न पडतो हाच का तो समाज ज्या समाजाने मानवाच्या अस्तित्व टिकवण्यासाठी मोलाची भर घातली होती समाजातील प्रत्येक घटकाला प्रेमाने आणि एकोप्याने राहायला शिकवले होते ?

आजच्या भारतीय समाजाचा परिचय

            मानवी समाजाची प्रगती गाव ,उद्योग , मानवी जीवन सुखकर करणारी भौतिक यंत्र यांच्या निर्मितीतून व्यक्त होऊ लागली . पण आज समाजाची वैचारिक , भावनिक आणि सामाजिक जडणघडण काही वेगळ्याच मार्गाने होत आहे . आजच्या समाजाचे स्वरूप म्हणजे आपल्या शेजाऱ्याचे नाव काय ? ते काय करतात ? ते कोण आहे ? हेच आपल्याला माहित नसते. मुळात ती जाणून घ्यायची आपली इच्छाच नसते. एवढी संकुचित विचारसरणी आजच्या मानवाची आणि मानवी समाजाची झाली आहे. स्वरूपावरून विश्व रूपाचे दर्शन घडते यावरूनच मानवी समाज आज कोणत्या पातळीवर येऊन पोहोचला आहे याची जाणीव नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या मनाला होत असेल?

         

दिशाहीन मानवी समाज

आदी गावांमध्ये एखाद्याच्या घरी काही कठीण प्रसंग आल्यास संपूर्ण गाव त्याला सहकार्यासाठी उभे राहायचे. कोणाच्या घरी एखादा सदस्य वारल्यास संपूर्ण गावावर शोककळा पसरायची आणि आज आपल्या बाजूच्या फ्लॅटमध्ये कोणी मरण पावले तरी त्याची कल्पना आपल्याला त्यांच्या घरातून मृतदेह कुजून दुर्गंधी यायला लागल्यानंतर येते हीच मानवी समाजाची मोठी शोकांतिका बनली आहे . आपले मन आणि आपण इतके एकलकोंडे झालो की आपल्या चार भिंतीच्या बाजूला कोणी सजीव प्राणी आहेत याची पुसटशी कल्पनाही आपल्या मनाला शिवत नाही .

         

दिशाहीन मानवी समाज

दिशाहीन मानवी समाज

आज हजारो जेष्ठ नागरिक घरी दिसत नाही तर वृद्धाश्रमात दिसतात . आज वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ते समाजाचे घटक असूनही समाजाने त्यांचा त्याग केलेला दिसतो. समाजाची इतकी अधोगती का झाली ? का होत आहे ? हा प्रश्न निश्चितच चिंतनीय आहे . समाजातील आणखी एक संस्था अनाथालय . अनाथ ज्यांचा कोणीही नाही . एखाद्याचं कोणीही नाही हे कसं शक्य आहे. अनाथ काही सूक्ष्मजीवांची जशी जैविक घटकांच्या एकत्रित येण्याने निर्मिती होते तशी निर्मिती होत नाही. कोणाचे ना कोणाचे भाऊ बहीण किंवा इतर नातेवाईक असतात. पण त्यांना आपलं मानण्यात कोणीही पुढाकार घेत नाही. म्हणूनच ते बिचारे अनाथाचं आयुष्या जगतात.

          आज हजारो बालके , वृद्ध पोटाची खळगी भरण्यासाठी हात पसरताना दिसतात. मानवी समाजाची ही शोकांतिकाच आहे की समाजातील काही व्यक्ती पोटाची चरबी कमी करण्याकरता धावपळ करताना दिसतात तर काही पोटाची खळगी भरण्या करता...

          कोरोणा काळाने तर समाजाचे खरे रूप आपल्यासमोर ठेवले. घरातील सदस्यच घरातील सदस्यांना दूर लोटत होते. त्यांचे मृतदेह स्वीकारायलाही तयार नव्हते . त्यांचे अंतिम संस्कार समाजातील समंजस लोकांना करावे लागले.

          एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ याप्रमाणे मानवी समाजाची दिशा असायला हवी होती . परंतु तो आज दिशाहीन होताना दिसत आहे . भरकटलेल्या मानवी समाजाकडे याच समाजातील काही घटक आशेने बघत आहे. नक्कीच या मानवी समाजाला पुनर्बांधणीची आवश्यकता आहे. 

           या अंधकारमय भविष्य लाभलेल्या समाजातही काही प्रकाशणारे तारे आहेत . जे समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे उदात्त कार्य करत आहे . आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करून एक नवा , जो मानवी समाजातील प्रत्येक घटकाला योग्य न्याय देणारा ,सर्वांना सोबत घेऊन मार्गक्रमण करणारा मानवी समाज निर्माण करण्याच्या कार्यात सहभागी व्हावे हीच अपेक्षा....


मोहन चालुरकर...


गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१

वृक्ष आणि मानवी जीवन

 वृक्ष आणि मानवी जीवन 

Human Life And Nature

वृक्ष आणि मानव यांच्यातील परस्पर संबंध

             पृथ्वीवर जीवनाच्या सुरुवातीपासून वनस्पती - पशुपक्षी गुण्यागोविंदाने राहत आले आहे.आणि एकमेकाबद्दलच्या अतिव प्रेमातून ,  मैत्रीतून ही वसुंधरा स्वर्गाहून सुंदर बनवली .

            सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणवणाऱ्या मानवाने या वसुंधरेचे वर्णन करताना तिला मातेची उपमा दिली आहे.या वसुंधरेचा वर्णन करताना किंवा तिची प्रतिमा अंतर्मनात साठवताना सर्वप्रथम आपल्या मनात येते ती हिरवा शालू परिधान केलेली वृक्ष आणि त्यावर स्वच्छंद मनसोक्त आनंदाने विचरण करणारे पशुपक्षी...

                या पृथ्वीतलावर वृक्ष आणि पशु-पक्षी (मानव ) यांची जोडी म्हणजे एक शरीर तर दुसरा त्या शरीराचा प्राण होय .दोघेही एकमेकांशिवाय आपलं अस्तित्व टिकावू शकणार नाही. 

परंतु मानव आज हे विसरत चालला आहे आणि वृक्षांची अविरत तोड करून तो वृक्षावर नाहीतर स्वतःच्याच पायावर कुराड मारत आहे.

             निसर्ग आपल्या अनेक कृतीमधून मानवाला वृक्ष आणि मानव यांच्या मैत्रीची सहसंबंधाची जाणीव सतत करून देत आहे पण मानव मात्र मदमस्त हत्तींप्रमाणे या संकेताकडे दुर्लक्ष करत आहे....

            या  निसर्गाचं देणं असलेला एक देणेकरी समजून आपल्याला या सहसंबंधाची , वृक्ष आणि मानवाच्या प्रेमाची जाणीव नवीन पिढीला करून द्यावीच लागेल तरच ही वसुंधरा परत आपलं गतवैभव प्राप्त करू शकेल.



mohan chalurkar ...


बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१

मानवाची प्रगती ...मानवाच्या मुळावर...


 मानवाची प्रगती ...मानवाच्या मुळावर...

Image from internet


              प्रगती ...  प्रगती आपण कशाला म्हणतो प्रगती ती जी मानवी जीवन सुखकर करते पण या मानवी जीवन सुखकर बनवण्याच्या प्रक्रियेत नैसर्गिक घटकांवर पर्यायाने निसर्गावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता मात्र कटाक्षाने पाळायला हवी.

             आजपर्यंत मानवाने जी प्रगती केली ती वाखाणण्याजोगी आहे पण यातील बहुतेक शोध म्हणा किंवा प्रगती ही अनपेक्षितपणे निसर्गाच्या नैसर्गिक संसाधनाच्या र्हासास कारणीभूत ठरली आहे.

 विसाव्या शतकात नंतर मानवाने भौतिकशास्त्राचे कमालीचे उपयोजन केले आणि जगाला अचंबित करणारी प्रगती केली मानवाची प्रगतीची झेप सरळ सूर्यमालेतील मंगळापर्यंत पोहोचली पण या प्रगतीच्या प्रक्रियेत निसर्गाचे मात्र अतोनात हाल झाली आणि मानवी प्रगती ही मानवा वरच संकट होऊन बूमरँग प्रमाणे परतली.

              प्रगतीच्या या प्रक्रियेत हवा पाणी जमीन तसेच अंतराळ दूषित झाले आणि नैसर्गिक संकटाच्या (ओला दुष्काळ ,कोरडा दुष्काळ , पूरस्थिती, ढगफुटी , भूकंप , वणवा) स्वरूपात वाढ झाली . मानवांच्या याच प्रगतीमुळे हरितवायूंच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आणि जलवायू परिवर्तन होऊन निसर्ग चक्र बदलले याचाच परिणाम म्हणून युरोपमध्ये कधी नव्हे इतका यावर्षी पूर आला, कॅनडाचे सरासरी तापमान 25 डिग्री सेल्सियस ते 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत राहायचे ते यावर्षी 40 डिग्री सेल्सियस पुढे गेले, चीनमध्ये पावसाने हजार वर्षाचा रेकॉर्ड मोडला, ॲमेझॉन जंगल पृथ्वीची जी फुप्फुसे मानली जाते तिथे खूप मोठा वणवा लागला आणि हजारो मुके प्राणी प्राणास मुकले . खरंच मानवाने जी प्रगती केली ती खरच प्रगती आहे की पृथ्वीचे आणि पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे अस्तित्व धोक्यात आणण्याची प्रक्रिया आहे. यावर विचार करणे ही काळाची गरज आहे.

मानवाच्या प्रगतीमुळे निसर्गाचे झालेलं नुकसान हे कधीही भरून निघणार नाही आहे.

मोहन चालुरकर...

Canada Heat wave

Amezon forest fire

UK's flood




 


सोमवार, २ ऑगस्ट, २०२१

आयुष्य

     



       विविध रंगांनी नटलेले फुल किती मोहक वाटते.निसर्गाची अशीच आपल्या अवतीभवती मुक्तहस्ताने रंगांची उधळण करून मानवी जीवन आनंदी केले. निसर्गात विविध रंगांची उधळण असल्यामुळे तो आपल्याला मोहक वाटतो.



तसेच मानवी जीवनाचेही आहे. मानवी जीवन ही राग , लोभ, आनंद ,सुख,दुःख, चिंता, काळजी, प्रेम, विरह, मैत्री, शतृता, स्वार्थ, अशा विविध भावनिक रंगांनी सजलेले आहे. आणि त्यामुळेच मानवी जीवनाला अर्थ आहे...


जीवनाच्या प्रत्येक रंगांचा आनंदाने आस्वाद घ्या. आनंदाने जीवन जगा आणि आपल्या संपकातील व्यक्तीच्या आयुष्यात आनंद रूपी रंगांची उधळण करा.


शुभ रात्री....

प्रयत्नांचा आनंद

          कधीकधी ध्येय प्राप्तीपेक्षा ध्येयप्राप्तीसाठी केलेल्या प्रयत्नात आनंद असतो.

प्रयत्नांचा आनंद

                 बहुतेक आपल्यापैकी सर्वांनाच सायकल चालवता येत असेल. सायकल चालवणे  शिकण्यासाठी केलेली धडपड , केलेले प्रयत्न जरा आठवुन बघा. आपण रोज सकाळी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा सायकल घ्यायचो आणि तासन्तास नुसतं सायकल पकडून पैदल फिरायचो कारण तेव्हा सायकलवर बसून चालवणं शक्य नव्हतं तरीपण त्यात एक मजा होती . नंतर हळूहळू सायकलवर बसून पायडल मारायला शिकलो. कधी पडायचं कधी खूप मार पण लागायचा पण प्रयत्न करायचं सोडलं नाही. कारण त्या प्रयत्नात एक मजा होती . खूप दिवस प्रयत्न केले आणि  एके दिवशी आपण मस्तपैकी सायकल चालवायला लागलो पण आता काय... सायकल तर चालवता येते किती दिवस चालणार आता कंटाळा येतो चालवायचा. आता ती मजा नाही आणि तो आनंद ही नाही.

               म्हणूनच जीवनात नेहमी ध्येयप्राप्ती हेच महत्त्वाचे असते असे नाही तर त्यासाठी केलेल्या प्रयत्नात खूप आनंद असतो त्या प्रयत्नांच हि आनंद घेता आला पाहिजे.

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

दिशाहीन मानवी समाज...

            दिशाहीन मानवी समाज मानवी समाज व्यवस्था  मानवी समाजाचा विचार करायचा झाला तर मानवाच्या उत्क्रांती पासून विचार करायला हवा . मानवाची...