सोमवार, ६ सप्टेंबर, २०२१

पैसा आणि मानवी जीवन. आज पैसा माणसापेक्षा मोठा झाला आहे का?

 पैसा आणि मानवी जीवन

पैसा आणि मानव

पैसा आणि मानव

          मानवाने आपल्या बुद्धीचा वापर करून पृथ्वीवरील आपले जीवन सहज व सुलभ केले. या मानवाच्या हजारो निर्मिती पैकी एक म्हणजे पैसा.

          आपले दैनंदिन व्यवहार सोपे करण्यासाठी मानवाने पैशाची निर्मिती केली. त्यामुळे त्याला वस्तूंची, सेवेची, एखाद्याच्या श्रमाची, किंमत करणे सोपे झाले. त्यामुळे व्यवहार करणे सहज झाले.

          आज माणसाचे सर्वच व्यवहार हे पैशाच्याच भोवती रेंगाळत असतात. प्रत्येक माणूस हा पैसा कमवणे याच उद्देशातून आपले व्यवहार करतो. कारण पैशाला असलेली किंमत. आज ज्याच्या कडे पैसा आहे तो आपले जीवन सुखी करू शकतो. त्याला समाजात मान-सन्मान मिळतो. या पैशाच्या मदतीने तो मोठमोठी कामे सहज करू शकतो. आज खरंच पैसा ही माणसाची अत्यंत निकडीची वस्तू बनलेली आहे.

          पैशाच्या निर्मितीमागे दैनंदिन व्यवहार सुलभ करणे हा मुख्य हेतू होता. परंतु याच पैशामुळे समाजात आर्थिक विषमता जन्माला आली. समाजातील काही घटक आर्थिक दृष्ट्या सक्षम बनली तर काही घटक दूर झाले आणि आर्थिक विषमतेची खोल दरी निर्माण झाली . श्रीमंत व्यक्ती उत्तोरत्तर श्रीमंत बनत गेला तर गरीब आणखीनच गरीब झाला. त्याला जीवन कसे बसे जगणेही या घडीला कठीण होऊन बसले आहे. त्यामुळेच समाजातील प्रत्येक घटक हा पैशाच्या मागे धावताना दिसतोय. याला आणखी एक कारण म्हणजे सामाजिक दृष्टिकोन.

          आज मानवाच्या विचारसरणीत एक मोठा बदल झालेला दिसतोय श्रीमंत व्यक्तींना समाजात मान सन्मान मिळतो तर गरीब लोकांना समाजात ही नेत्यांची वागणूक दिल्या जाते.

पैसा आणि सामाजिक दृष्टिकोन

          आजच्या वर्तमान सुसंस्कृत समाजात मानवापेक्षा काय मोठे असेल तर तो म्हणजे पैसा. पैसा आहे तर 'कर लो दुनिया मुठ्ठी में ' नाहीतर आप कतार मे है कृपया प्रतीक्षा करे'  ही मानवाची गत . कारण एकच- पैसा . विज्ञान सांगते मानवी देहाची किंमत $10M आहे. पण जिवंतपणी त्याच्याकडे पैसा नसेल तर मात्र काडीची किंमत नसते. खरंच समाजात माणसाची किंमत, लायकी मोजण्याचे एकक बनले आहे पैसा.

          जे उदात्त हेतू ठेवून मानवी समाजाची निर्मिती मानवाकडून झाली त्याच मानवाकडून पैशामुळे समाजातील घटक असलेल्या मानवाची उपेक्षा होत आहे. खरंच हे सत्य आहे का आज मानवापेक्षा पैसा मोठा झाला.?

          हे निर्विवाद खरं आहे की पैशाने आपण सर्व सुखवस्तू घेऊ शकतो .जीवन सुखकर बनवू शकतो. पैशाने आपण जीवन सुखी व सुलभ बनविण्यासाठी भौतिक गोष्टींची पूर्तता करू शकतो .हे खरच आहे.. पैसा असेल तर एखाद्याने ते खुशाल करावं.. पण पैसा आला म्हणजे माणसाने आपली माणुसकी विसरावी हे कितपत योग्य आहे?

          आज आपल्या अवतीभोवती आपल्या दिनचर्येतून वेळ काढून बघण्यास आपल्याला नक्कीच जाणवेल की पैसा हा माणसाच्या डोक्यात शिरला आहे. या पैशाची नशा ही मद्यापेक्षा जास्त प्रभावाने मानवी मनाला उत्तेजित करून समाजातील इतर मानवाला शूद्र नजरेने बघण्यास प्रलोभित करत आहे.

          साधे हॉटेलमध्ये गेल्यास तिथे काम करणार्‍या वेटर ना कुणी दादा ,भाऊ किंवा वेटर म्हणून आवाज देत नाही तर अरे ए, इकडे ये, किंवा तोंड उघडताच ओठांचा चंबू करून शु.. क, शु... क असा आवाज देतात . ते काय नोकर आहेत आपले ? अरे तेही पण मानव आहेत आणि प्रामाणिकपणे आपले काम करत आहे . जसा माणूस म्हणून आपल्याला काही सन्मान आहेत तसेच त्यांनाही मानव म्हणून द्यायला नको का? नाही या सुसंस्कृत समाजात पैशाने मोजमाप केल्या जाते माणसाचे म्हणून त्याला तशी वागणूक....

          रस्त्याच्या कडेला छत्रीच्या सावलीत बसलेल्या चप्पल शिवणारा माणूस, गावातील रस्त्यांची साफसफाई (भल्या सकाळी उठून) करणाऱ्या सफाई कामगार स्त्रिया, घरातील भांडे कपडे धुणार्‍या स्त्रिया भाजी मंडईत जीवाच्या आकांताने ओरडणारे भाजीविक्रेते, घरासमोर अन्नाची याचना करणारे याचक इत्यादी सहजच आपल्याला कमी दर्जाचे वाटतात . हे मानव नाहीत हे समाजातील घटक घटक नाहीत का?

          लाखो करोडो चे घोटाळे करून देश पालन करणारे, गरीब कल्याण योजनेचे पैसे खाणारे अधिकारी, लाखो करोडो भ्रष्टाचार करणारे भ्रष्टाचारी, यांच्यापेक्षा तरी त्यांची लायकी, पात्रता एक माणूस म्हणून नक्कीच मोठी आहे. मग समाजातील एक भाग यांच्याकडे तुच्छतेने का बघत असावा?

          खरंच आज माणसापेक्षा पैसा मोठा झाला आहे का?  माणसाची माणुसकी, दर्जा मोजण्याचे एक परिमाण बनले आहे का???

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

दिशाहीन मानवी समाज...

            दिशाहीन मानवी समाज मानवी समाज व्यवस्था  मानवी समाजाचा विचार करायचा झाला तर मानवाच्या उत्क्रांती पासून विचार करायला हवा . मानवाची...