गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव  

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

           माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्याची 75 वे वर्ष अमृत महोत्सव म्हणून साजरे करण्याचा मानस दिनांक 8 मार्च 2019 रोजी बोलून दाखविला . या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम तसेच विविध संकल्प यावर चर्चा केली व या कार्यक्रमावर विविध सूचनांची मागणी केली.

              भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना प्रत्येक देशवासीयांनी स्वातंत्र्याच्या 75 वर्ष आपण काय मिळविले ?काय गमावले ? आणि समोर आपण काय मिळवायला हवे आणि त्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न करायला हवे ? याचा मनोमन विचार करणे आवश्यक आहे.

    देशातील आव्हाने     

     विविधतेत एकता हे भारताचे सर्वात मोठे ठळक वैशिष्ट्य आहे . देशाची विविधता ही भौगोलिक सामाजिक एक आणि आर्थिक बाबतीत प्रकर्षाने जाणवते . देशात अनेक जाती धर्म पंत तसेच आर्थिक स्तरातील लोक राहतात . पण ते सर्व प्रखर राष्ट्रवाद आणि देशाबद्दल असणाऱ्या अतीव प्रेमातून एक संघ आहेत.

शेतकरी आत्महत्या वास्तव

देशातील शिक्षणाचे प्रमाण




स्त्रियांवरील वाढते अत्याचार

अशा या एक संघ देशात विविधतेतून अनेक समस्याही निर्माण झाल्या. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या पदार्पणातही देशात गरीबी ,जातिवाद ,निरक्षरता ,आरोग्याच्या समस्या ,शेतकरी आत्महत्या ,स्त्रियांवरील होणारे अत्याचार या सामाजिक समस्यांमध्ये कुठेच कमतरता आल्याचे दिसून येत नाही. 

  देशात विकासाची गंगा वाहत असतानाही या सामाजिक समस्यांचा अंत आपल्याला करता आला नाही ही खेदाची बाब आहे यासाठी शासन आणि देशवासी म्हणून आपणही तेवढेच जबाबदार आहोत .

भारतीय अर्थव्यवस्था 

  स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर ही भारतीय समाज आणि भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी आणि कृषी संबंधित व्यवसायावर आधारित होती आणि आहे . एके काळी जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेली भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटिश राजवटीमुळे रसातळाला गेली . स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेला ( indian economy ) आपल्या पायावर उभी राहताना खूप संकटांना सामोरे जावे लागेल . सन 1991 ला देशाला आपले सोने गहाण ठेवण्यापर्यंत आर्थिक संकटांचा सामना करावा लागला . परंतु तत्कालीन सरकारच्या (जवाहरलाल नेहरू -पंतप्रधान व नरसिंहराव- वित्तमंत्री ) आर्थिक नीतीमुळे भारतीय अर्थव्यवस्था परत जोमाने उभी राहू लागली . उदारीकरण व मुक्त अर्थव्यवस्था यांसारख्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था आता वार्षिक 8% नी वाढत गेली.

               भारतीय अर्थव्यवस्था उत्तरोत्तर वाढतच आहे . सोने गहाण ठेवण्याची नामुष्की ओढवणारी भारतीय अर्थव्यवस्था आज जगात सहावी मोठी अर्थव्यवस्था आहे. अर्थशास्त्र्यानी वर्तविलेल्या अंदाजानुसार भारतीय अर्थव्यवस्था सन 2025 पर्यंत इंग्लंडला मागे टाकून पाचव्या नंबर वर जाणार आणि सन 2030 पर्यंत ती तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार . हे वर्तविलेले अंदाज खरे करण्याची मोठी जबाबदारी भारतीय शासन कर्त्यावर आहे आणि ती ते निश्चितपणे पार पडतील यात यत्किंचितही ही शंका नाही.

                चीनची जागतिक भेट असलेल्या करुणा काळातही भारतीय अर्थव्यवस्था डगमगली नाही आणि अशा कठीण काळातही परदेशी गंगाजळीत भारत जगात तिसऱ्या नंबरवर आहे. हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे यशच आहे.

                हा एक विरोधाभासच आहे ही देशाची आर्थिक व्यवस्था सुधारत असताना देशातील जनतेची परिस्थिती मात्र बिकट होत गेली . देशातील जनतेचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यात व कृषी आधारित अर्थव्यवस्थेचा पाया असलेल्या कृषी क्षेत्राला न्याय देण्यात भारतातील शासन करते कमी पडले . स्वातंत्र्याच्या या 75 वर्षाच्या पदार्पणातही अनेक सरकारे आली नि गेली परंतु कोणतेच सरकार या परिस्थितीमध्ये बदल घडवू शकले नाही. 

दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या

            देशात रोजगार निर्मितीच्या फसलेल्या धोरणाचे फलित म्हणजेच वाढती बेरोजगारी व वाढलेली आर्थिक विषमता , हे कोणते सरकार कमी करू शकली नाही . आज देशात 29% म्हणजेच 37 कोटी लोकसंख्या दारिद्र रेषेखालील आपले जीवन व्यतीत करत आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात बेरोजगारी मुळे निर्माण झालेल्या गरिबीचा /दारिद्र्याचा चेहरा अधिकच भयानक आहे.

            स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना शासनकर्त्यांनी बेरोजगारी , गरीबी , दर्जा व अस्तित्व हरवलेली कृषी व्यवस्था , महागाई यासारख्या बाबी वर लक्ष केंद्रित करून राजकारण न करता प्रामाणिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे . तरच देशाला आर्थिक महासत्ता होण्याचे स्वप्न बघण्याचा अधिकार आहे . या बाबी दुर्लक्षित करून आर्थिक महासत्ता होणे हे केवळ स्वप्नवतच राहणार.

विज्ञानातील गरुडझेप

            स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना प्रत्येक देशवासीयांची शेती छाती अभिमानाने फुलणार अशी नेत्रदीपक कामगिरी भारतीय अंतराळ संशोधन व रक्षा या क्षेत्रात भारताने केली.

isro first rocket launch

  जेव्हा भारताचे पहिले रॉकेट प्रक्षेपण सायकल व बैलगाडीच्या मदतीने करावे लागले , तेव्हा जगातील सर्वच विज्ञान व तंत्रज्ञानात अग्रेसर असणारे देश भारता कडे बघून हसत होते परंतु तीच राष्ट्रे भारताच्या पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी करण्याने अचंबित झाली. अशी कामगिरी करणारी इसरो ही अंतराळ संस्था एकमेव ( पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी करणारी ) आहे व तिचा प्रत्येक भारतीयांना अभिमान आहे.

 

 भारताच्या विज्ञान क्षेत्रात मोलाची भर  घालणारे वैज्ञानिक यांचा सर्वांना अभिमान वाटतो.

Great Scientists of India
Kangana With Z plus Security

 स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना देशातील शासकांनी एखाद्या पडद्यावरील नटीला झेड प्लस सुरक्षा देण्या ऐवजी देशाच्या खऱ्या अभिनेत्यांना (वैज्ञानिक / शास्त्रज्ञ) झेड प्लस सुरक्षा द्यावी हीच नम्र विनंती.

Security issue of Scientist

 माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार प्रत्येक भारतीय देशवासी भारत मातेच्या सेवेसाठी आपले प्राणही द्यायला मागे हटणार नाही . परंतु शासनानेही देशातील प्रत्येक नागरिकांचे सामाजिक , आर्थिक , मानसिक समस्यांचे निराकरण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून आपली राजकारणाची दिशा ठरवावी .

सारांश

              स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रसंगी हेच सांगावेसे वाटते की देशातील शासन कर्त्यांचा केवळ शासन करणे हाच हेतू नसावा तर देशसेवा , देशाची प्रगती ही उद्दिष्टे समोर ठेवून त्यांनी मार्गक्रमण करावे आणि भारताला जागतिक महासत्ता , जागतिक गुरु बनवून गतवैभव ,आदर ,मान-सन्मान प्राप्त करून द्यावा .तेव्हाच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव खऱ्या अर्थाने जन उत्सव होणार .....नमस्कार....




Mohan Chalurkar... 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Visit again. Follow this blog.

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

दिशाहीन मानवी समाज...

            दिशाहीन मानवी समाज मानवी समाज व्यवस्था  मानवी समाजाचा विचार करायचा झाला तर मानवाच्या उत्क्रांती पासून विचार करायला हवा . मानवाची...