बुधवार, २८ जुलै, २०२१

निसर्ग आणि मानवी जीवन


 पाणी ... 

Nature



      किती अद्भुत रसायन . जीवनाची सुरुवात या पाण्यापासूनच झाली आहे. सजीवांना जिवंत राहण्यासाठी मूलभूत आवश्यक घटक म्हणजेच - पाणी.

        मानवी स्वभाव आणि पाणी यामध्ये अनेक बाबतीत विशेष साधर्म्य जाणवते. नाल्याचे ओढ्याचे पाणी कसे खळखळून वाहते तसेच काही माणसे जीवन खळखळून आनंदाने जगतात. परंतु नाल्या ओढा प्रमाणे त्यांचे जीवन अल्प असते पण ते त्या अल्पशा जीवनात खूप भरभरून जगतात आणि इतरांना आनंद देतात. नदी कुठे कुठे संत वाहते कुठे नागमोडी वळणे घेत रौद्र रूप धारण करते. तर पावसात पूर आणून सर्वनाश करत निघते. माणसाचा स्वभाव तसाच असतो. शांत जीवन जगणारा कुणाशीही कधी देणेघेणे नसलेला माणूसही कधी कधी रौद्र रूप धारण करून आपले आणि संबंधिताच्या आयुष्यात कलह माजवून देतो . म्हणूनच शांत माणसांना कोणीही छेडण्याचा प्रयत्न करत नाही आणि करू पण नये . जसा स्वच्छ नितळ पाण्याचा तळ आपण स्पष्टपणे पाहू शकतो तर गढूळ पाण्याचा तळ आपल्याला समजत नाही. तसेच स्वच्छ मनाच्या माणसाला आपण सहज समजू शकतो तर दूषित मनाच्या मानवापासून दूरच राहणेच बरे कारण गढूळ पाणी आणि दूषित मनाचे माणसे आपल्याला नक्कीच बुडविणारे असतात . अशा पासून नेहमी सावध रहावे.


            निसर्ग आपल्याला नेहमी जीवन जगण्याची कला शिकवत असतो फक्त निसर्ग कडे निरीक्षक आणि चौकस दृष्टीने बघण्याची आवश्यकता आहे.

            निसर्ग आणि मानवी जीवनाचा संबंध हा अनंत काळापासून आहे. तो मानवाला प्रेमाने जीवन कला शिकवत असतो. परंतु मानव प्रगतीच्या नावाखाली निसर्गाचा समतोल बिघळवत आहे.  रोखणे ही काळाची गरज आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Visit again. Follow this blog.

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

दिशाहीन मानवी समाज...

            दिशाहीन मानवी समाज मानवी समाज व्यवस्था  मानवी समाजाचा विचार करायचा झाला तर मानवाच्या उत्क्रांती पासून विचार करायला हवा . मानवाची...